tag:blogger.com,1999:blog-4321544431792963152024-02-19T08:54:08.351-08:00शेलामनाचिये गुंती गुंफियेला शेलाSneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.comBlogger21125tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-82052025089886735972011-07-13T02:21:00.000-07:002011-07-17T22:53:42.314-07:00प्राक्तनमाणसाच्या जाण्याबरोबर शक्यतांचं एक भेंडोळं आपसूक हाती येऊन पडतं.<br />कुठून सोडवायला सुरुवात करावी हे न उमजता सामोर आलेलं.<br />सगळ्याच शक्यतांचा गुंता.<br />तू असतास तर..<br />किंवा आता इथे तू हवास..<br />तू काय म्हणाला असतास..<br />वैतागला असतास..<br />कपाळावर एकच आठी मिरवत..<br />किंवा खळखळून हसलाही असतास..<br />संध्याकाळचा प्रकाश तुझ्याच डोळ्यात परावर्तित होताना<br />मधाळ झाला असता..<br />कदाचित मिश्किल हसू उमटताना <br />तुझ्या चेहर्यावरची पेशी न पेशी नव्यानं दिसली असतीही..<br />अशा अनेक धाग्यांना मी एकाच वेळी सोडवू बघते..<br />जमत नाहीच मला.<br />म्हणून एक एक धागा पकडून सावकाशीनं उलगडत जावं <br />तेव्हा आपल्याबरोबर नवे गुंते निर्माण करत जाते.<br />परत एकदा अगतिक, हताश, डोळ्यातलं पाणी परतवत, त्याच्याकडे पहायचं.<br />सुटेल कधीतरी.<br />अजून एखादी भेट.<br />किंवा एखादा कॉल. <br />एखादी मेल, चॅट.<br />काहीच नसेल तर कुठेतरी अजून अडकून राहिलेली,<br />स्वप्न आणि सत्याच्या सीमारेषेवर लोंबकळणारी,<br />अर्धवट आठवण की कल्पनाच.<br />काहीतरी येईलच पुढे.<br />कोडं सुटेल.<br />तुझ्या पाऊलखुणांचा माग लागेल.<br />बंद केलेल्या दारांआडून तू कुठे गेला असशील याचा अंदाज येईल.<br />आज नाही तर उद्या.<br />तोपर्यंत या शक्यतांना चाचपणं येवढंच करू शकते मी.<br />तेच माझं प्राक्तन.<br />कदाचित.Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-1330387032725260322011-02-28T04:46:00.001-08:002011-02-28T04:52:20.277-08:00सहेला रे!रंगलेल्या मैफीलीतून बाहेर निघताना शांत उत्साही चैतन्य वाहत असतं. काय अनुभवलं ते मांडाव कुठंतरी, लिहावं, पटकन फोन करुन कुणाला सांगावं तरी अशी भावना होत असते. इतका आनंद एकट्यानंच घेताना डोळे झरतात, त्यांच्यावर ताबा ठेवून रस्त्याकडे बघावं लागतं, कितीही घेतलं तरी आपली झोळी फाटकीच कशी त्याची जाणीव परत परत होत असते. जे काही दान कणभर घेता आलं ते पुढे ठेवायचं म्हटलं तर त्याच्या पात्रतेचं तरी मांडता येईल का असं होऊन जातं. फुलपाखरू क्षणभर हाती यावं आणि निसटताना त्याचे रंग फक्त बोटाला चिकटून रहावेत तसं काहीसं. नुसतंच लखलखणारं रंगीत अनुभवांचं विश्व! <br /><br />************ <br /><br />कलापिनींना प्रत्यक्ष ऐकायची संधी पहिल्यांदाच मिळालेली. सकाळची दहाची वेळ. लख्ख उजळलेला रंगमंच. सगळं लक्ष त्या समोरच्या त्रिदेवींवर. मध्यभागी बसलेल्या कलापिनी. शेजारी कौशिकी आणि नंदिनी बेडेकर. तोडीचा बडा ख्याल सुरु करणार असं सांगून कलापिनींनी सुरुवात केली, एवढंच आणि इतकंच आठवतंय मला. एखादा 'सा' सुध्दा काय अनंत भाव घेऊन येतो! त्यानंतर जादूची कांडी फिरावी तसं स्थलकालाचं समग्र भान गेलंच आणि सुवर्णरंगीय उधळण सुरु झाली. कधी नितळ सुवर्णाचा शांत प्रवाह तर कधी थुईथुई नाचणारे अनंत सोनेरी कण आणि त्याला असणारं एक अनामिक आकर्षण. जणू सुवर्णाचं, चैतन्याचं विवर समोर आहे आणि त्यात खेचलं जाण्याशिवाय काही करता येणारच नाही अशी भावना क्षणोक्षणी कळून येतेय. इथे प्रतिकाराला वाव नाही, इथे आग्रहाचं आमंत्रण आहे त्या विश्वात शिरण्याचं. आणि त्यातून तुला बाहेर निघताच येणार नाही पोरी! <br /><br />************ <br /><br />अनवट समेवर वाजणारी खंजिरी, त्याच्या आधी सुरवातीलाच षटकार ठोकत स्वतःचं वेगळेपण ठासून सांगणारा घट, मध्येच करुण आलापी घेणारी सारंगी, त्याच्याच जोडीनं येणारा पखवाज, तालाला जिवंत करत जाणारा तबला आणि या सगळ्याला बांधून ठेवणारे सूर. प्रत्येक समेवर येणारी 'वाह' ची दाद. शरीराला हजारो कान असले तरी पुरेसं ऐकता येईल की नाही अशी शंका यावी इतका ताला-लयींचा सुरेख खेळ! नेहमी 'जेवणात कस्सं मीठ बरोबर असलं तर मजा येते' तशी भूमिका घेणारी तालवाद्य इथे स्वत:ची बलस्थानं उलगडून सांगताना. आणि प्रत्यक्ष झाकीरभाईंच्या हातात तर वीज खेळत असताना हे सगळं ऐकत राहणं. खरंच दुबळी झोळी! <br /><br />************<br /><br />वेणूचे स्वर तळ्याकाठी ऐकू यावेत, मधूनच सतारीची एक चाहूल. या सगळ्याला वेढून जाणारा संतूरचा स्वरसमूह. तळ्याच्या काठी शांत पाण्यात पाय बुडवून बसावं तसं झालंय. पण अचानक वारा बदलतो. इतकावेळ शांत, निस्तब्ध असलेल्या तळ्याला आवाज फुटतो. पावसाच्या हलक्या सरी सुरु होतात. आणि पाण्यावर त्याचे ध्वनी उमटायला सुरुवात झालीये. हळूहळू पावसाचा जोर वाढतोय आणि इतकावेळ अशक्त वाटणारा थेंबाचा आवाज आता टिपेला पोचू पाहतोय. सगळीकडे धारा. शांतवत जाणार्या. नखशिखांत भिजवून टाकणार्या. आत खोलवर, मनाच्या तळापर्यंत त्या कोसळताहेत आणि इथे फक्त झेलण्याशिवाय काहीच करता येत नाही. शुध्द सारंगातली ही जुगलबंदी ऐकल्यावर पुढं काही अनुभवणं शक्यच नव्हतं. उरलं ते फक्त स्वरांचं गारुड!<br /><br />*************Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-75214989389151653022011-01-31T04:39:00.000-08:002011-02-01T18:33:07.984-08:00अमूर्ताचं काहीबाही..काय आहे ह्या चित्रात? नुसतेच फरकाटे तर ओढलेत! जे काही मांडायचं आहे, ते स्पष्टपणे का नाही मांडत हे लोक?<br /><br />नुसत्याच फ्रेम्स, काहीच न कळता मांडून ठेवल्यासारख्या. त्यातली पात्रं कसली विअर्ड वाटताहेत.. बोलून टाकावं की घडाघडा..आर्ट फिल्म म्हटलं की कळणार नाहीच असं असलंच पाहिजे का?<br /><br />तासंतास चालणारी रागदारी.. कसले कसले मूड्स दाखवलेत म्हणे! ते काय कळत नाही बुवा आपल्याला. सगळं अॅबस्ट्रॅक्ट. तासभर एकच ओळ आळवत रहायची, कळत नाहीच असं काही अमूर्त असं..<br /><br />अमूर्त, बरोबर.. हाच शब्द शोधतेय मी. <br /><br />सरळ, साधं, सुटसुटीत, सोपं, व्यवस्थित आखीव रेखीव, चकचकीत.<br /><br />एखाद्या जाहिरातीतल्या तयार घरातल्या कातलेल्या आयुष्यासारखं.<br /><br />असतं का असं सारखं आजूबाजूला?<br /><br />शब्दात न बसणारं, पकडीतून निसटून जाणारं, आटोकाट चौकटीत बसवायचा प्रयत्न केला तरी त्याबाहेर पसरलेलं, बदलाच्या शक्यता, अर्थांचे कवडसे मिरवत राहणारं ते<br /><br />अमूर्त.<br /><br />अनिश्चित असणार्या भविष्यासारखं विविधरंगी, भूतकाळासारखं फ्रेमबध्द नाही असं काहीतरी.<br /><br />प्रत्येक भावनेला शब्दात मांडून तिचा नफातोटा न जुळवता येण्यासारखं काहीतरी.<br /><br />पाहिलं की आत कुठेतरी खोलवर जखम करत जाणारं.<br /><br />काहीतरी उकलत, उसवत जातंय आत, येवढं जाणवून देणारं.<br /><br />आपल्या आत कुठलातरी एक मुखवट्याविना चेहरा शिल्लक आहे, त्याची ओळख पटवून देणारं.<br /><br />हे सगळं अमूर्त असतं ना?<br /><br />का त्याला स्वीकारायला घाबरतो आपण? <br /><br />कधीकधी लख्खकन वीज चमकून जावी तसं ते येतं ही मूर्त रूपात.<br /><br />ऑगस्टातल्या मरगळलेल्या, रिपरिपीत संध्याकाळी सूर्याची एकच तिरीप ढगांमधून निसटू पहाते तेव्हा ग्रेसला शरण जातोच की आपण.<br /><br />ऐन थंडीतल्या संध्याकाळी नुसताच मारवा ऐकताना ऊर फुटेपर्यंत रडू येतं. कुठल्या कुठल्या आठवणींना बोलावणी धाडली जातात.<br /><br />अमूर्ताला मूर्त व्हायला पण वेळ यावी लागते, तोपर्यंत त्याला मुरवत ठेवावं.<br /><br />कुठल्याशा जुन्या गंधालीत लपवून.<br /><br />मूर्त होण्याचे साक्षात्कार अवचितच घडतात.. त्यांच्या प्रतीक्षेत रहावं.<br /><br />तोवर आहेच की अमूर्त, अॅबस्ट्रॅक्ट जुळवत रहायचं.Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-47011425017688739122010-08-01T07:08:00.000-07:002010-08-01T10:36:40.816-07:00स्वप्नातल्या कळ्यांनो..काही स्वयंसेवी संस्थांना भेटण्याचा योग कामानिमित्त आला. तेव्हा एकूणच संस्था सुरू कशी झाली , तिचा वाढत गेलेला व्याप अशा संदर्भात बोलणं झालं. कुठल्यातरी स्वप्नानं भारलेली ही माणसं. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी झटली/ झटत आहेत. पण त्यातच 'आम्ही आमच्या स्वप्नात कुणाला वाटेकरी केलं नाही,एकट्यानंच प्रवास केला 'असं एक वाक्य ऐकल्यावर मी थोडीशी थबकले. <br />मान्य आहे, की स्वप्नं ही आपली. आपल्यापुरती जोपासलेली. पण संस्थेचा घाट घालतानाची सुध्दा? ज्यामुळे कित्येक लोकांवर परिणाम होऊ शकतो अशी फक्त स्वप्नं एकट्यानंच पहायची आणि घडवायची? क्षणभर त्या कामाचा आवाका पाहून दडपायला झालं. पण आपल्या कल्पना दुसर्याना पटवून देताना, दहा जणांना त्यात जागा देताना त्याच्या चिंधड्या व्हायच्या शक्यताच जास्त. जी कल्पना डोक्यात आहे ती तशीच उतरवता येत नाही प्रत्यक्षात, तेव्हांची तडफड आणि त्याहीपेक्षा मूर्त स्वरूप आल्यावर कदाचित झालेलं अपेक्षाभंगाचं दु:ख.<br />सगळंच आपल्यापरीनं बरोबर.<br />पण मग संस्थेच्या पातळीवर जेव्हा हे आजचे स्वप्नकर्ते उद्या नसतील तेव्हा काय? कुठल्या नव्या कल्पनांचे साचे रेडिमेड मिळणार हाताखालच्या लोकांना नंतर, असंही आहेच की. मग आहेच ठरलेल्या वाटेवरून जात रहात कुठलीही नवी गोष्ट अब्रह्मण्यंच्या थाटात नाकारणं. किंवा होत जाणारा र्हास आणि मूळ स्वप्नापासूनची होत गेलेली फारकत.<br /><br />***********************<br />सुझन बॉयलला जेव्हा पहिल्याप्रथम पाहिलं तेव्हा तमाम जनतेप्रमाणं मलाही अपार सहानुभूती दाटलेली. कशाला ही बाई स्वत:चं हसं करून घेतेय असंच वाटलेलं. पण तिनं पहिला सूर लावला आणि त्या सार्या शंका फिटल्याच.<br /><a href="http://www.youtube.com/watch?v=RxPZh4AnWyk">I dreamed a dream!</a><br />कसलं गाणं होतं ते. पाहिलेली स्वप्नं, रंगीबेरंगी, आशेची किरणं असलेली. आयुष्यानं त्या सगळ्याला निर्दयीपणाने तुडवलं त्याचा आक्रोश. सरकन काटाच उभा राहिला अंगावर. अजूनही कधीतरी कातरवेळी लावलं तर तस्संच होतं खरं.<br />स्वप्न काय असतं? निव्वळ आशावाद? अमूर्त कल्पना? जगायला नवी उमेद?<br />आणि त्यांना घडलेलं पहाणं म्हणजे काय? त्यांना जखमी,रक्तबंबाळ करणं?<br />त्यांच्याबरोबर झगडताना स्वतःला कणाकणानं खंबीर करत जाणं?<br />किंवा कोसळून जाणंही?<br />कदाचित सगळंच.<br />आणि त्याचा रंग? रंग म्हणताच एक <a href="http://en.wikipedia.org/wiki/The_Terrorist_%28film%29">टेररिस्ट्चा</a> सीन आठवला. मृत्यूच्या कठड्यावर उभी असलेली नायिका. गर्भवती. आता एका क्षणात सगळं संपेलच. तिचा निर्धार आहेच तसा. ती आणि त्याबरोबर तो इवलासा जीवसुध्दा. संघटनेच्या उद्दिष्टापुढे हे सर्व व्यर्थ असं मानत गेलेली ती. तिला त्या लहानग्याची स्वप्नं नव्हतीच पडलेली फारशी, मग त्या शेवटच्या क्षणी फक्त एक ब्लँक फ्रेम येते आणि एक हुंकार. ती क्षणभर थांबते.<br />काय आहे हे? त्या बाळाचं स्वप्न? कधीही न पाहिलेलं? आणि तरीही इतकं लोभस वाटावं असं.<br />ती निर्णय बदलते.<br /><br />स्वप्नांना कायम रंग चढलेच पाहिजेत असं नाही. अशी रिकामी स्वप्नंही असतात .<br />कमालीची सुंदर.<br /><br />**********************<br />सोनचाफ्याच्या लख्ख सुगंधाचं स्वप्न पाहिलेलं मी<br />तुझ्या सुगंधी ओंजळीतून<br />प्रत्येकवेळी जागी झाल्यावर तुला सांगायचं ठरवूनही राहून गेलंच ते<br />आता चाफ्याचा गंधही टोचत राहतो<br />आणि आताशा लख्ख स्वप्नं सोसतही नाहीत.<br /><br />*********************Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-2124986961166422010-06-15T09:01:00.000-07:002010-06-15T09:32:38.933-07:00विहीरटवका उडालेली स्वप्नं सावरताना विहीर दिसते अचानकच<br />थंड कठडा<br />उतरत गेलेल्या पायर्या<br />आत डोकावून पाहिलं तर काळं हिरवं पाणी पोटात साठवून बसलीये ही<br />सूर मारला की तोंडावर फटकावणारी<br />आणि तसंच तरंगत राहिलं की दिसतं वरचं निळंभोर आभाळ<br />गोलाकार कठड्याला बांधून ठेवलेलं<br />स्वप्नं सांधत नाहीत कदाचित<br />विहीर फक्त नजरेला शांतवते... तेवढाच दिलासा.<br />************************<br />माणसाच्या शारीरिक अस्तित्वाशी करकचून बांधता येतात का आठवणी?<br />स्पर्श<br />श्वासाची लय<br />कधीतरी रात्री दचकून उठल्यावर थोपटणार्या हातांची उब<br />त्याच्याही पलीकडे जाऊन आठवणींचे लपंडाव<br />अर्ध्या कच्च्या आठवणींचे नुसतेच ठोकळे<br />कुठे रिकामी महिरप आणि सतत ठिबकत राहिलेली वेदनेची जाणीव.<br />परत परत आठवांनी भरलेलं मन कोरडं कुठे होतं?<br />*********************<br />विसर्जनाचा विरघळून टाकणारा कल्लोळ आणि भावनांना तासताना<br />संपत जाणारी मी<br />कॅलिडोस्कोपातून दिसणारं तुकड्यातुकड्यांचं चित्र मी जमेल तशा<br />आठवणींनी जोडतेय तरीही अर्धवटच<br />अनुभवलेली प्रत्येक जाणीव आठवणीतच जमा होते हे सांगावं लागतं मलाच<br />परत परत<br />माझ्या अस्तित्वाचा भ्रम का त्याच्या नसण्याचा मी मांडलेला भ्रम?<br />********************<br />काळजाच्या नजरेने गोळा करता येतो<br />डहुळणार्या पाण्यातला चंद्र<br />पण तरीही आपल्याला मांडता येतात त्याच्या नसण्याच्या<br />गणितांची उत्तरं?<br />विहीरीच्या कठड्याशी उभारलं की त्याच्या नसण्याचे ठसे पुसले जातात<br />तो सापडतोच असं नाही, पण मी मला नव्याने दिसते हे काय कमी आहे?<br />*********************Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-16828736193472492632010-04-19T10:39:00.000-07:002010-04-22T07:29:12.881-07:00प्रवासकचकन ब्रेक दाबून बस थांबली तशी ती एका क्षणात जागी झाली. जागी झाल्या झाल्या जाणिव झाली की तोंड कोरडं पडलंय आणि पाठीला रग लागलीये. एकतर खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि पुढंमागं हलवतासुध्दा न येणारी सीट. समोर अडकवलेल्या पिशवीतून बाटली काढून तिनं तोंडाला लावली. काही वेळापूर्वी थंडगार लागणारं पाणी कोमट झालेलं आणि मचूळ लागंत होतं. एक घोट घेताच तहान संपली. शेजारच्या सीटवर अस्ताव्यस्त पसरलेली मध्यमवयीन बाई. अगदी रूमाल डोक्याला गुंडाळून पर्स पोटाशी धरून. तिच्याच वयाची किंवा लहानच असेल एखाद वर्षं. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत झोपलेली. पायाशी तिच्याच दोन पिशव्या. बहुतेक नवरा आलेला तिला सोडायला. शेजारी लेडीजच आहे का हे दहांदा विचारून मग तिच्या नवर्यानं तिकिट काढलेलं. गाडी सुटेपर्यंत तिनं केलेल्या हजार सूचना आणि तरीही शेवटी गाडी सुटताना हिच्या अंगावर रेलतच खिडकीतून 'मी फोन करते पोचल्यावर' अशा अर्थाच्या केलेल्या खाणाखुणा. तिला एकच क्षणी तिचा मत्सर आणि तुच्छ्ता जाणवून गेली. बरी झोप लागते यांना अशी. आपल्याला म्हणजे सरळ लागलेली झोप अशी अध्येमध्येच तुटली की पुढचा सगळा प्रवास डोळे टक्क उघडे. तिनं थोडाफार खांदा सोडवायची धडपड केली पण दुसर्याच मिनिटाला खांद्यावर टेकू आहेच. तिनं नाद सोडलाच मग.<br /><br />बस नक्की कशासाठी थांबलीये ते काही कळत नव्हतं. खिडकीतून भिरीभिरी वारं येत होतं थोडंफार. तिनं अजून थोडी खिडकी उघडली आणि बाहेर मान काढून बघायचा व्यर्थ प्रयत्न केला. मागच्या गाडीचा हेडलाईट आणि पुढच्या दोन चार गाड्यांच्या सावल्या येवढं सोडून काहीही दिसत नव्हतं. डाव्या बाजूला कसलंतरी शेत असावं किंवा नुसतंच माळरान. दूर कुठेतरी एखादा पट्टा चंदेरी चकाकत होता. दूरवर चारकोलने गिरगिटावा तसा झुडपांचा पट्टा दिसत होता. अधूनमधून एखादा दिवा. त्या पट्टयाच्या मध्ये लांबवर पसरलेला काळसर फिकुटत गेलेला निळा आणि आकाशात सुरेखशी चंद्रकोर. अगदी पौर्णिमा नव्हे पण अगदी भरलेल्या दिवसांची वाटणारी. कसला सुरेख निळा आहे.. निळ्यावरून ती कुठलीतरी कविता म्हणायचा ना अभी. .. काय बरं ...'आकाशीच्या घुमटाचा एक गोलसर निळा..' ती म्हणायला लावायची त्याला ती कविता कधीही मूड येइल तेव्हा. जणू काही ते सारे निळे त्याच्याचभोवती फेर धरत आहेत असा डोळे मिटून कसल्याशा तंद्रीत असायचा तो. आणि बरोबर इंदिवर निळ्याची ओळ आली की तो डोळे उघडून तिला लक्षात आहे का त्यासाठी पहायचा. अर्थातच तिला लक्षात असायचंच, पण तरीही तो सांगतोय परत तर का थांबवा म्हणून ती ऐकून घ्यायची. त्या निळ्यावरून काय काय चालू करायचा तो. निळा म्हणजे वरवर शांत पण हात लावशील तसा मन मोकळं करत जाणारा. त्याच्या पोटात किती दु:ख किती वेदना साठवलेल्या ते ज्याचं त्यालाच कळतं. अगदी गॉगच्या स्टारी नाईटपासून ते मग अख्खा गॉग त्याच्या गुणवैशिष्टांसकट वाचल्याशिवाय त्याला चैन कुठलं पडायला. तिला खरंतर त्याचं फारसं कळायचं नाही. तिला खर्याखुर्या दिसणार्या गोष्टी लागायच्या.हात लावून कळणार्या , समोर मांडलेल्या दिसणार्या. त्याच्या भाषेत सांगायचं तर ऑडिट करता येणार्या आणि अॅप्रिशिएट किंवा डिप्रिशिएट होणार्या. <br /><br /><br />'ओ डायवर का थांबून राहिलायसा.. काय अक्शीडेंट झाला का काय? '<br /><br /> कुणाच्या तरी आवाजानं तिची तंद्री भंगली. ड्रायव्हरनं एक पिचकारी खिडकीतून टाकत सांगितलं की कंडक्टर उतरलाय खाली तेव्हा कळेलच काय झालंय ते. किती वाजलेत ते तरी पहावं म्हणून तिनं सेल काढला. रात्रीचे तीन वाजून गेलेले. जर इथे न थांबती तर बस दोन तीन तासात पोचेल मुक्कामाला. सकाळी वेळेवर पोचता येइल म्हणून ही बस घेतली आणि आता कितीवेळ तरंगत रहावं लागणार काय ठाऊक या विचारानं थोडी चिडचिड झालीच तिची. अभीला मेसेज टाकावा का या विचारात तिनं मेसेज बॉक्स उघडला. मी इथे अशी अडकून पडल्येय किंवा परवा सकाळी घरी पोचेन असं दोनतीनदा लिहून खोडून झाल्यावर पण नक्की काय लिहायचं ते कळेना तेव्हा बराच वेळ त्या हलणार्या कर्सरकडे पहात बसली. या टूरला बाहेर पडले त्याआधीच तो त्याच्या एक्झिबिशनमध्ये अडकलेला. त्याला निघालेय ते सांगायची संधीच नाही मिळाली तेव्हा मांकडेच निरोप ठेवला झालं. पण हे असं मांना मध्ये आणून पण किती दिवस झाले.. आठाठ दिवस ज्याला खबर नसते आपली तो आत्ताचा जीवाचा वैताग वैताग करणारा अभी का आठवतोय आताच्या क्षणी? मग तो मगाशी आठवलेला हसरा अभी कुठल्या काळातला?<br /><br />'काय कंडक्टर , काय झालंय?' <br />' एक कार ब्येक्कार आपटलीये बगा. माणूस जित्ता र्हायची काय खात्री न्हाय. पोलीस आल्याती, निगेल आत्ता ट्रेफिक.' <br /><br />कंडक्टरनं सांगितलं तरीही माणसं उगाचच पाय मोकळे करायला बाहेर पडली. बायांच्या सुस्कारांनी आणि कुठेतरी एखाद्या पोरानं रडण्याचा सूर लावून एवढावेळ शांत वाटणारी बस पुन्हा माणसांनी भरलेली जिवंत केली. तिच्या शेजारच्या बाईनेपण मध्येच एकदा 'का थांबलीये बस " असं विचारून उत्तर मिळायच्या आत झोप सुरू ठेवली. काही वेळात पुढच्या गाडयांचे स्टार्ट झाल्याचे आवाज ऐकू आले तसं तिनं डोकं मागं टेकवत झोपायचा निष्फळ प्रयत्न सुरू केला.Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-76495199072035237692010-03-31T11:26:00.000-07:002010-03-31T22:02:52.090-07:00...नवं नवं म्हणता म्हणता शहर सवयीचं होऊन गेलं आणि आता परतीच्या प्रवासाचे वेध पण लागलेत. आधी रूळेपर्यंत या नव्या शहरांचं नव्या प्राण्यासारखं असतं, माणसाळायला वेळ घेतात, कधी अंगावर येतात आणि कधी अशी सवयीची होउन जातात की मागचे सारे ओरखडे कधी पुसट झालेत ते जाणवूही देत नाहीत. पण सुरवातीला कितीही नाही म्हटलं तरी आधीच्या जागांबरोबर तुलना होतेच. तिथले मॅप्स जास्त चांगले आहेत, अमक्या ठिकाणी airport कस्स्ला मोठा आहे, हे तर कसलं गाव आहे त्यापुढे... मनात एक प्रोसेस सुरु असतेच अशा खोड्या काढायची.<br /><br />हळूहळू हातात मॅप पकडून , नेट्वरून जायचा येण्याचा माग काढत एकदम टूरिस्ट स्टाईलने सगळ्या इमारतींवर लेबलं लावली जातात. म्हणजे ही अर्धगोलाकर आहे ना तिथून वळून गेलं की ट्रेन स्टेशन किंवा त्या ब्रिजच्या मागे एक चौक ओलांडला की सुपरमार्केट. या धांदलीत आजूबाजूचे लोक फारसे पाहिले नाही जात. रस्ता विचारणं किंवा काहीतरी अतर्क्य वेशभूषा असेल तेवढंच. एकदा का रस्ते सवयीचे झाले की ट्रेनमध्ये शेजारी बसलेल्या, उभारलेल्या, आणि तरंगत पुस्तक वाचणार्या सगळ्यांचे निरीक्षण सुरू होतं. काय अधांतरी वाचतोय हा? हिची झोप नाही वाटतं झाली पूर्ण.. तोंडात माशी गेली तरी कळणार नाही ...आता हिला उठवून सांगीतलं की तुझं स्टेशन निघून गेलं तर काय करेल ही? पळत जाऊन दारापाशी उभी राहील बघत की मलाच वेड्यात काढेल? नुसतंच कल्पनांशी खेळत रहायचं. अरे, या ड्रेसचं काँबिनेशन मस्त आहे, चेरी रेड A लाईन ड्रेस आणि काळे स्टॉकिंग्जस्...हं..कूल... एवढं म्हणेपर्यंत काकूनी चक्क क्रोशाचं विणकाम सुरू करून धक्का देऊन टाकलेला. नुस्ताच निरीक्षणांचा खच आणि अंदाजपंचे धागोदरसे.<br /><br />शहर सोडताना यातलं काय काय वागवायचं बरोबर? लोक नाही, जागा तर नाहीच नाही आणि आठवणी ना धड रुजलेल्या ना सोडता येणार्या.का जे राहीलं ते राहीलं आणि जे सुटलं ते रुजलंच नाही म्हणून सोडून द्यायचं... पण मग आपण ते रुजू नाही दिलं याची बोच कधीतरी जाणवेल का? किंवा जाणवावी का?स्टीव्ह जॉब्स म्हणतो तसं सगळे डॉटस् कनेक्ट होणार आहेत पुढं. पण ते कसे होणार ते मला आत्ताच कसं कळेल? कदाचित या आठवणी, लोक, आणि जागा रुजल्याही असतील कुठेतरी. कधीतरी याही आठवणींनी नॉस्टॅल्जीक व्हायला होईल. सध्यातरी नुस्ताच सगळा गुंता. प्रत्येक वेळी मागे वळून पाहीलं तरी पुसून गेलेला रस्ता आणि पुढचा तर ठाऊकच नाही अशा वळणावर येऊन थांबणारी मी. तरी सिंदबादसारखी पुढच्या प्रवासाची खुमखुमी पाठ नाही सोडत.<br /><br /> इथं काय शितं सांडायची होती ती झाली, आता वेध पुढच्या वाटांचे. कदाचित मुक्कामापेक्षा वाटांचीच भूल पडावी असंच असावं.Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-82138321174771112792009-08-05T07:55:00.000-07:002009-08-05T08:10:19.690-07:00ती आणि घरलांबच्यालांब सुट्टीवरून परत येताना तिला कधीचेच घराचे वेध लागलेले असतात. एकदा घरात जाऊन पडलं की झालं असं स्वतःलाच समजावत ती लिफ्ट्पाशी येते. रात्रभराचा प्रवासाचा थकवा सगळ्या हालचालीतून जाणवणारा. रोज न ऐकू येणारा पहाटेचा अलार्म कुठेतरी वाजतो आहे. कुलुप काढता काढता तिला आठवतं की भाजी फ्रिजमध्ये तशीच राहिलेली. इस्त्रीचे कपडे जाताना टाकलेले ते आता आणावे लागतील. <br /><br />खरंतर या सुटीच्या आधी सगळ्या सगळ्याचाच कंटाळा आलेला तिला. रोज उठून आवरायचा, धडपडत ऑफिस गाठायचा, परत आल्यावर पसरलेल्या घराचा इतकंच नव्हे तर खिडक्यांना लावलेल्या पडद्यांचा पण. तरीही आता घरात शिरताना तिच्या नजरेत फक्त माया असते. स्वतःच्या घरात आहोत या जाणिवेचं उबदार अस्तर बाकी सगळ्या भावनांना लपेटून टाकतं. मग ती कितीही थकलेली असूनही कामाला लागते. अस्ताव्यस्त पसरलेल्या घरातून तिचं अस्तित्व शोधते.<br /><br />तिच्या नसण्यानं रुसलेलं घर पण हळूहळू मूड्मध्ये येतं मग. किती दिवसात गॅलरीत बसून चहा प्यायला नाही हे तिला आपोआपच जाणवतं. कपाटं आवरताना कधीचं आणून ठेवलेलं कवितांचं पुस्तक सापडतं तेव्हा ती कसली खुशीत येऊन तिथेच ठाण मांडते. खिडकीतून गुलमोहराची एक फांदी अलगद हाताला लागेल अशी आलिये हे तिला आत्ताच दिसतं. आपल्याच घरात ती परत नवीन होऊन जाते मग. स्वतःलाच आठवत साठवत रहाते तिथल्या प्रत्येक खुणेसरशी. पहिल्यांदा मोगरा फुलला तेव्हा कशी ती पण बहरून गेलेली. आवरून झाल्यावर चहा घ्यायला ती कशी एका ठरावीक ठिकाणी बसायची जिथून बाहेरची वर्दळ दिसायची पण त्याचा त्रास नाही व्हायचा. मावळत्या संध्याकाळी 'भय इथले' ऐकताना कशी कावरीबावरी झालेली ती देव्हार्यासमोर बसून अथर्वशीर्ष म्हणत शांतावलेली. सार्या सार्या घरात फक्त तिचा सडा.. <br /><br />रोजच्या जगण्यातून हे सगळं विसरून गेलेली होती ती. छोटे छोटे आठवणींचे आणि स्वप्नांचे तुकडे. आषाढातला मुसळधार पाऊस पडत असताना खुर्चीत गोधडीत बसून आल्याचा चहा प्यायचं स्वप्न. कुमारांचं उड जायेगा ऐकता ऐकता बैठकीवर ओणवं पडून पुस्तक वाचायचं स्वप्न. कुंडीतल्या ब्रह्मकमळाला एकसाथ फुलं यावीत आणि त्यावेळी चंद्राच्या प्रकाशात तिथंच रात्रभर बसून रहावं.. कितीतरी स्वप्नं.. आठवणी आणि स्वप्नांची सरमिसळ झालेली. घरातल्या प्रत्येक गोष्टीवर जडलेल्या आठवणींची की आठवलेल्या स्वप्नांची. कुणा तिसर्याला वेडगळ वाटणारी पण तिच्या घरात रुजून गेलेली बावरी ती आणि तिची स्वप्नं.Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-73907066817457592652009-04-09T05:47:00.000-07:002009-04-09T09:33:40.114-07:00Father and Daughterती सायकलवरून चाललेली दोघं. बहुतेक नव्यानेच सायकल शिकलेल्या छोटीची बाबाच्या बरोबरीनं नाहीतर त्याच्या पुढं सायकल नेण्याची धडपड चाललीये. पण बाबा तिच्याबरोबर आस्ते आस्ते चाललाय. टेकडी आल्यावर दमछाक झालिये तिची. पण उत्साह तितकाच. वरती झाडांशेजारी सायकल टेकवून ती समोरच्या नदीकडं पहाताना गुंगुन गेलिये. पण इतक्यात बाबा नदीपाशी गेला सुध्धा. पण नावेकडे जायच्या आधी परत आला तो. छोटीला उचलून निरोप घेतला. किनार्यावर बांधलेली नाव सोड्वून त्यानं वल्हवायला सुरुवात केली. छोटी बघतीये सारं. तिच्या डोळ्यात कदाचीत प्रश्नांचं काहूर. जसजशी नाव दूर चालली तशी ती अधिकाधिक अस्वस्थ. पाय उंचावून बाबाला नजरेच्या ट्प्प्यात ठेवतीये ती. अंधारायला लागल्यावर मात्र सायकल घेऊन एकटीच निघाली . येतानाचा उत्साह मावळून गेलाय आता परत जाताना.<br /><br /><br />परत ती आली बाबाची नाव शोधायला. आल्यावर झाडाशेजारी उभारून बाबाची तासंनतास वाट पहायचा तिचा नेम चुकला नाही. वादळ- वार्यात , पानगळीत , पावसात.. ती येत राहिली. आता तर तिला टेकडी चढायला वेळपण लागायचा नाही फारसा. आपले खांद्यावर रूळणारे केस सावरत ती येऊन थांबायची तिथे. त्या जागेशी असलेलं तिचं- स्वतःचं नातं तिलाच ठाऊक.. बाबा असता तर तिनं कित्ती किती गोष्टीं-गुपितं सांगितली असती..शाळेचा पहिला दिवस.. पहिली मैत्री.. बाबानं पोटाशी धरून कुरवाळलं असतं पहिलंवहिलं बक्षिस मिळल्यावर.. आशा आणि निराशेच्या खेळात आपणच आपली समजूत काढत रहात ती थांबायची. मग तिला मैत्रिणी मिळत गेल्या. रोजचं येणं कमी-कमी होत गेलेलं.कधीतरी भटकंती करताना आलीच तिथं तर मात्र क्षणभर का होईना थांबून जायची. 'बाबा इथेच कधीतरी भेटेल' अशा भाबड्या आशेवर 'बाबा परत न येणार्या जगात गेलाय ' हा व्यावहारिक शहाणपणा वरचढ ठरत गेला असेल का वाढ्त्या वयानिशी?<br /><br /><br />आयुष्याच्या नाजूक वळणावर मग तो आला. त्याच्यामागं बसून जातानाही तिची नजर झाडांच्या पलीकडे शोधत रहायची. रोजच्या रामरगाड्यात बाबाला रोज आठ्वायला वेळ तरी कुठं होता? पुढं मग ती मुलांना घेऊन यायला लागली. नदीकाठच्या हिरवळीवर बसून मुलांना खेळतानाही शोधाची एक छ्टा जिवंत होती का निरागस आठवणींचा कप्पा अलगद उघडून हरवून जायची ती? शेवटची आली ती तेव्हा हळूहळू सायकल ढकलत आणलेली . तिच्या सगळ्या प्रवासाची सायकलपण साक्षीदार, तिनं पण साथ सोडली. पण आता सूर्य मावळतीला आलाय. संध्याकाळ्च्या सावल्या जाणवत आहेत, तेव्हा पुन्हा एकदा बाबाला भेटायला आलीये ती. समोरच नदीचं वाळवंट पसरलेलं. किनार्यावरच्या वाळूत चालत जाताना तिला तीच नाव दिसते... तिच्या बाबानं नेलेली.आता वाळूत अडकलेली.. त्या जुन्या नावेला कुरवाळत राह्ते ती, जणू जुनी सखी भेटलीये. 'कुठं हरवली होतीस गं बयो? जगण्याच्या रखरखाटात आली असतीस तर..' बाबाच्या कुशीत जितकी शांतपणे पहुडायची तशी ती नावेपाशी पोटाशी पाय घेऊन पड्लीये आता ती. नावेशी गुजगोष्टी करत. आयुष्यभराची शोधयात्रा डोळ्यासमोर सांडलेली. सगळ्या लहानपणच्या गोष्टींना रंग चढलाय... मग इतक्यात तिला तिचे बाबा दिसला.. जाताना होता तसाच, हसर्या डोळ्यांचा. मधली सारी वर्षं उडून गेली आता. आणि त्याची चिमुरडी त्याला घट्ट मिठी मारून किलबिल करायला लागलीये.<br /><br /><br />प्रत्येक वळणावर मागच्या स्मॄतींचा गुंतलेला धागा आणि समाधानी वाटचालीला लागलेलं हुरहुरीचं एक हलकसं गालबोट. आयुष्यातली शोधयात्रा कशी मांडायची जमा-खर्चाच्या रकान्यात? न मिळालेल्या प्रश्नांना जपून ठेवत की नको असलेलं सत्य समजूतींच्या आड दडवत.. नात्यांचा हा चिरंतन शोध.. .<br /><embed id="VideoPlayback" style="WIDTH: 400px; HEIGHT: 326px" src="http://video.google.com/googleplayer.swf?docid=" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" hl="en&fs="></embed><br /><br />Father and Daughter(२०००)मायकेल डुबोट द विट - अॅकेडॅमी अवार्ड विनर अॅनिमेशन फिल्मSneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-41969635527867073272008-06-29T20:13:00.000-07:002008-06-29T20:25:15.187-07:00कभी फुरसत से कर लेना हिसाब..आजचा पॅमचा आमच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस. तिला कळू न देता तिच्या फेअरवेल पार्टीची सगळी तयारी करण्याची आमची धडपड. दुपारी मीटिंगच्या निमित्ताने तिला रूममध्ये बोलावून मस्त सरप्राईज दिलं तेव्हा खुललेला तिचा चेहरा. आधी 'काय शेवट्च्या दिवसापर्यंत कसल्या मीटिंग आणि कसलं काय..' असा भाव ते एकदम सगळ्यांना बघून आश्चर्य ते मग एकदम दिलखुलास हसणारी पॅम.. अवघ्या पाच मिनिटात काय वेगवेगळी दिसली. आधी तिला शुभेच्छा , तिच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव असं सगळं झाल्यावर मोर्चा खाण्यावर वळला. हळुहळु लोक पांगायला लागले, तसं निरोप घ्यायची वेळ जवळ येतेय असं तिलापण जाणवलं.<br />निरोप घ्यायचाय, निघून सोडून जायचंय, वैताग झालाय असं सगळे कधी ना कधी तरी म्हणत असतोच, तशीच तीही. पण निरोप घ्यायची वेळ विचित्र होते.. म्हणजे हे आताच जे होतं त्यातलं थोडं हवंय, खरंतर तसं बरंचसं बरं पण आहे, नवीन ठिकाणी जाऊन सगळं नव्यानं सुरू करण्यापेक्षा हे ठिकाय, पण तरीही नव्याची ओढ आहे. आतापर्यंत केलेली मनाची तयारी, वाईट न वाटून घेता 'हे फक्त आता वाटतंय, परत आपल्या देशात गेलं की आठ्वणार पण नाही' अशी हजार मन रमवणारी उत्तरं दिली तरी निरोप घ्यायचा तो एक क्षण काही चुकत नाही. त्याची तीव्रता , त्यातलं दु:ख आहे ते आहेच. सगळं तिच्या डोळ्यात साठून आलेलं आणि ती ते थांबवायच्या प्रयत्नात.. असल्या वेळी काय काय बोलायचं असतं त्यातलं काहीच नाही बोलता येत, म्हणजे 'बयो, तू येवढ्या चिकाटीनं काम करतेस गं' किंवा ' अगं मला तुझ्याकडून हे शिकायचं होतं बघ..' असलं काही-बाही बोलावंसं वाटत असताना मला काहीच बोलता नाही येत. आली वेळ फक्त निभावून न्यायची झालं.<br />पण आत्ता पॅम काय विचार करत असेल.. वर्षा-दोन वर्षापूर्वी इथं येताना पोटात कशी फुलपाखरं फडफडलेली त्याचा की परत गेल्यावर काय काय गोष्टी मिस केल्या त्या करायचा की इथं कसा त्रास झाला आणि कसंकसं त्यातून सांभाळलं त्याचा..<br /> नव्या शहरात येऊन मुळं रुजवताना आधीची पायधूळ कशी जपतात माणसं.. खरं माणसांचं आणि शहरांचं काय नातं असतं? अनोळख्या शहरात ओळखीच्या पायवाटा सापडत जातात की कुणीतरी अज्ञात मुसाफिरानं त्या आधीच मळवलेल्या असतात्..की आपल्या माणसांबरोबर शहरंपण ओळखीची वाटायला लागतात.. नक्की काय? यातलं कितपत काय बरोबर असे हिशोब तरी कसल्या आधारानं मांडतात लोक.. पूर्वानुभवांच्या की कधी मनात आलेल्या क्षणीक विचारांच्या लाटेवर स्वार होत... माहीती नाही..<br />कुठल्यातरी ओढीनं मजल- दरमजल करत उचललेली पावलं वळणं पार करत एका ठिकाणी थबकतात तेव्हा त्याना प्रत्येक वेळी बरोबर वाटेवर चालल्याचा थोडाच भरवसा असतो? पण तरीही माणसं हिशेब करतात, वाटा शोधतात आणि ' मुझ को पेहचानती है कहां मंझिले' म्हणत चालत रहातातच. कदाचीत वाटांची भूल कदाचित मंझिलांची ओढ..<br /><br />काही नसलं तरी हातात रहातातच, गुंतलेले क्षण आणि निरोपांचे अश्रू..Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-56746627301808397202007-12-09T07:07:00.000-08:002007-12-09T07:13:42.252-08:00रेघोट्याच सार्या...<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJMG4pJUDGxw2S5wQ5f0R6uNe14rPnXiPfUputP6Mb9YPHONV-kPhjIHWlQDI-sJBOvQzIFh_KE_UCqa5VCPV7kxxi-Xm05-W9Ljc3OF213XR7C8UwKM35P_RI4lILmSGcp5qYUyzbjnEO/s1600-h/Nisha.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5141991325650591554" style="CURSOR: hand" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJMG4pJUDGxw2S5wQ5f0R6uNe14rPnXiPfUputP6Mb9YPHONV-kPhjIHWlQDI-sJBOvQzIFh_KE_UCqa5VCPV7kxxi-Xm05-W9Ljc3OF213XR7C8UwKM35P_RI4lILmSGcp5qYUyzbjnEO/s320/Nisha.jpg" border="0" /></a><br /><div>लिहायला काहीच सुचत नाहिये, किंबहुना या जगाशी संपर्कच तुटल्यासारखा झालाय. त्यामुळे सध्या फक्त हे चित्र. अर्थातच कुणी यावर कमेंट दिली तर आवडेल निश्चितच!</div>Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-89276521358816455912007-08-19T07:39:00.000-07:002007-08-19T07:41:46.472-07:00कभी ना बीते चमकीले दिन..The Happiest Man मध्ये डॅनी के आपल्या आईला विचारतो, 'हे इतके श्रीमंत लोक आपल्या घरी पुन्हा पुन्हा का येतात गं? ' त्यावर त्याची आई म्हणते, 'त्यांच्या आयुष्यातला खूप चांगला भाग ते इथेच ठेवून गेले आहेत ना, तो परत जगायला!'<br />पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा हे कळंलं असं वाटलेलं उगीच. खरंतर असं असेल अशी किंचितही जाणीव नसलेले ते दिवस. एकाच छापाचे दिवस असू शकतात हेच मुळी कळायचं होतं तेव्हा. किंबहुना 'लख्ख उजळलेले दिवस' ही संकल्पना जन्मायची होती माझ्यापुरती.<br />एखादा मठ्ठ रटाळ दिवस उगवावा, कुठल्यातरी जुन्या वाईट आठवणींच सावट घेऊन आल्यासारखा. त्यात धबधबा पाऊस कोसळतोय म्हणजे डिप्रेसिंग मूड्ला अगदी निमंत्रणंच. हुरहुरणारी कातरवेळ अजूनच गडद होत जाणारी. अशात एकदम कुठलीतरी मैत्रिण खळाळणार्या उत्साहात घरी येते किंवा अचानक एखादा मित्र भेट्तो रस्त्यावर.<br />जादूची कांडी फिरवावी तशी आनंदाची वलयं ओसंडून जातात.<br />तेव्हा त्या वलयात आजूबाजूची माणसं, पाऊस असल्या सगळ्या गोष्टी हरवतात. कुठल्याकुठल्या आपल्या आपल्या वाटणार्या गूळपीठीय गोष्टींना वाचा फुटते आणि इतके दिवस हे कुठं लपून राहिलेलं असं वाटायला लागतं. मगाचच्या त्या 'मूड' ची पुरती दाणादाण उड्ते. काहीही ग्रेट न करताही उगाचच काहीतरी अचिव्ह केल्याची जाणीव होते आणि फक्त संध्याकाळच नाही तर अख्खा दिवस लख्ख उजळून जातो मग.( आता यासाठी थँक्स म्हणण्याइतका कोरडेपणा नाही करता येत मला, आणि सुदैवानं माझं बरंचसं मित्रमंडळ हे वाचतही नाही त्यामुळं त्याची फारशी गरजही नाहीये! :P )<br />कधीकधी जो आयुष्यातला चांगला भाग ज्यांच्या हाती सोपवून मी विसरले आहे, ते असे अधूनमधून त्याची जाणीव करून देतात. त्याला नॉस्टॅल्जिया म्हणा किंवा काहीही. पण 'आपण भारीच आहे रे!' या ब्रीदवाक्याची परत गर्जना करत पुढच्या कित्येक एकसुरी दिवसांची धार कमी होते हे निश्चित!Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-61658003715763222982007-06-30T20:03:00.000-07:002007-06-30T20:04:11.349-07:00बोलाचा भात!"ताल्पिट.. क्या होता है ये?" माझ्या अमराठी रूममेट्ने शक्य तितका बरोबर उच्चार करत विचारलं.<br />" ओह, थालीपीठ ( ठ चा अगदी ठसठशीत उच्चार करत) अरे बहोत सही होता है.. मेरी मॉम बनाती है ना ( माझ्या जवळपास सगळ्या पदार्थांची सांगायची सुरवात माझी आई/मावशी/ काकू/ आत्या/ आज्जी यानी बनवलेल्या त्या पदार्थांच्या आठवणीत रमलेल्या मनाला जागं करून होते. ) तो पहले हम सारे आटे (??) आय मीन सारे फ्लोअर लेके उसमे ओनियन ( प्याज गं ,माझी बयो) डालते है और उसका गोला बनाके तवे पे थापते मतलब लगाते है.. ( हिंदीचा आणि पर्यायाने थालीपीठाच्या रेसिपीचा यथास्थित चुराडा करूनही माझ्या रूममेटच्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह काय संपलं नाही.)<br /><br />आता एखादीनं काय केलं असतं की एकतर गेला बाजार आपली हिंदी सुधारून चांगली रेसिपी दिली असती नाहीतर कमीतकमी थालीपीठ करून खायला घातलं असतं. पण नाही, आम्ही समस्या दिसली किंवा नसली तरी शोधून काढून त्याचे विश्लेषण करणार. तिच्या (समस्येच्या हो) मूळावर घाव घालायच्या प्रयत्नात आम्ही. तर आमचे असं का होतं? दाक्षिणात्यांची इडली-डोसा-सांबार , पंजाब्यांचे सरसों का साग आणि मक्के की रोटी इतकं जगप्रसिध्द आणि जगभर मिळत असताना आमच्या मराठी पदार्थांना काहीच 'ब्रँड व्हॅल्यू' असू नये म्हणजे काय ते! प्रश्न अगदी मराठी अस्मिता- आम्ही मराठी सदैव मागंमागंच का, अशा धोकादायक वळणांवर जाताना पाहून मी विचारांचे उधळलेले घोडे आवरले आणि पाककृतीचा शोध सुरू केला.<br />अस्सल मराठीतून गुगलून झाल्यावरही हव्या तशा पाककृती सापडेनात ( थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे यावर विकी ने थालीपीठाला खाऊन टाकलं होतं!) मराठीतून फूड ब्लॉग (अर्थात अन्न्-जालनिशी??) खूपच कमी आहेत असंही दिसलं. इंग्लिश्मधले सुरेख छायाचित्रांनी नटलेले ब्लॉग्ज पाहून खर्या अर्थानं रसना रसरसली. पण असे सुरेख पदार्थ माझ्या हाती आपलं सारं अस्तित्व विसरून तिसर्याच कशाच्या रूपात अवतीर्ण होतात हे काही नवीन नाहिये! आताही थालीपीठांनी तवा सोडायचं नाकारलं, आपलं तोंड काळं करत तव्याचा बट्ट्याबोळ करवला जेणेकरून माझ्या रूममेट्ला कुठुन ही अवदसा आठवली याचा पुनःप्रत्यय दिला.(काम आणि कंटाळा याच्या अभूतपूर्व संगमामुळे मी मागच्या पोस्टवरती अजून प्रतिक्रिया टाकतेच आहे, अशा भयानक उत्साही मला असलं काही सुचलं याचं समाधान वाटावं की केलेल्या पराक्रमामुळे थक्क व्हावं असा पेच पडला असणार तिला!! :D ) आणि वरती माझी प्रतिक्रिया होतीच, अरे मेरी मॉम ये बहोत अच्छा बनाती है.. ( खरंतर 'मी बनवलेला हा पदार्थ आतापर्यंत मी खाल्लेला सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे' आणि 'माझे केस हे सगळ्यात सुंदर केस आहेत' असं म्हणणारी मुलगी/तरूणी/स्त्री/ वृद्धा मलातरी आढळलेली नाहीये, त्यामुळे मी ही काहीही केलं आणि कसंही झालं तरी पहिलं वक्तव्य करायचं सोडत नाही!!)<br />माझे प्रयोग मी संपवल्यानंतर माझ्या रूमीने शहाणपणाने भात रांधायला घेतला आणि डाळ शिजायला ठेवली. तस्मात काय, कधीतरी स्वयपाकघरात जाऊन प्रयोग करण्यापेक्षा मराठी अस्मिता जपायचे अजून मार्ग आहेत ( आणि ते तोंडातून जात असले तरी पोटात जात नाहीत!) त्यामुळे बोलांच्या कढीभाताचे प्रयोग सुरू ठेवणे श्रेयस्कर!Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com17tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-2924244423421440272007-06-07T21:01:00.000-07:002007-06-07T21:11:05.580-07:00ऐसी अक्षरे!<span class=""><span class="">परवा साध्या स्केचबुकसाठी दुकानात उचकापाचक करताना अचानक कॅलिग्राफीच्या कटनिब आणि बोरू असा सगळा सेट दिसला. परत कॅलिग्राफी सुरू करायची आहे असं म्हणूनपण आता युगं लोटलेली. पण समोर ते सगळं पाहताच सेपिया मोडमधल्या दिवसांची दाटी झाली.<br /><br />टोकदार पेन्सिलींनी अक्षर कोरून काढायचे दिवस ते गळणार्या पेनांनी रंगणारी बोटं सांभाळत लिहायचे दिवस,<br />दर रविवारी शाईनी बरबटलेली पेनं सारे भाग सुटे सुटे करत साफ करायचे दिवस,<br />रेनॉल्ड्च्या त्या फिक्कट निळ्या पेनापासून ते अगदी 'Made in China' वाल्या सोनेरी टोपणाच्या हिरो पेनापर्यंत प्रगती केलेले दिवस.<br /><br />अशाच कुठ्ल्यातरी दिवसात कटनिबचं खूळ (अर्थातच आईच्या मते 'खूळ', आमच्यामते सुलेखनाचे प्रयत्न!) डोक्यात शिरलेलं. अर्थात त्या दिवसात पॉइंटेड छानसं पेन आणि लेदर कव्हर असलेली डायरी या अशा गोष्टींसाठी आईकडे हट्ट करताना हा एक नवीन हट्ट.<br />कुणातरी मैत्रिणीनं आपल्या नव्या कोर्या वहीत पहिल्या पानावर नाव लिहून घेतलेलं आपल्या भावाकडून ( असले सगळे भाऊ, हे भयंकर हुश्शार आणि बेक्कार माज करायचे ,आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मस्तपैकी राबवून घ्यायचे त्या काळी!!) ते ट्पोर्या अक्षरातलं नाव बघून मला माझ्या वही-अक्षर जे काय असेल त्या सगळ्याची कीव यायला लागली. मग आम्हीही त्या बंधुराजांचा मॅड्सारखा पिच्छा पुरवून कटनिब पैदा केल्या आणि काय असतील ते प्रयोग सुरू केले. काही दिवस अगदी उत्साहानं केलेले प्रयोग अर्थातच थंडावले पुढं आणि परत एकदा 'बॉलपेन झिंदाबाद' मोहिमेत आम्ही सामील. ( आईच्या भाषेत नव्याचे नऊ दिवस करून झाले!)<br /><br />हं.. इतकं सारं आठवलं ते बघताना आणि परत एकदा त्या वेडानं मात केली. त्याची परिणती तो अख्खा संच घेऊन येण्यात झाली. आता जे काही आणलेलं ते आधी केलेल्या कशाशीही साधर्म्य दाखवत नव्हतं. एकतर आधी कटनिब नेहमीच्या शाईपेनात बसवायची असल्याने बाकी काहीच लागायचं नाही. पण या सार्या आधुनिक मामल्यात जो बोरू होता तो शाईत दर २ सेकंदानी बुडवा, त्या नकट्या नाकाच्या निबला सांभाळत लिहायचा प्रयत्न करत रहा. आणि या कसरतीत ग्रेसची कविता लिहा (करा अजून उपद्व्याप आणि भोगा आपल्या कर्माची फळं!)<br /><br />मराठी लिपीतले असंख्य आकार- उकार दमछाक करवत होते. साधं 'अ' घ्या, एक अर्धगोल, त्याला आणि एक अर्धगोल जोडा मग आडवी दांडी त्याला एक जोडून एक काना आणि या सगळ्याला आपल्या छ्त्रछायेखाली घेणारी एक शिरोरेषा. हुश्श.. पहिल्यांदा म्हणजे अगदी पहिल्यांदा अक्षरं गिरवताना 'अ' काढताना नक्की काय वाटलं होतं ते काही आठवत नाहीये. पण आईनं गिरवून घेतल्यावर तिला काय वाटलं असेल ते थोडं फार जाणवलं. प्रत्येक अक्षरावर धडपडत अख्खी कविता पूर्ण केली तेव्हा जग जिंकल्याचा आनंद झाला.<br /><br />म्हटलं तर साधी अक्षरं, पण परप्रांतात - परदेशात आपल्याला ऑनलाईन दिसली तरी आपल्या नाळेशी जुळल्याची भावना निर्माण करतातच की. शेवटी अक्षर म्हणजे तरी काय, कुणासाठी भावनांना मूर्तरूप देण्याचं माध्यम, कुणासाठी कलेची अभिव्यक्ती तर कुणासाठी फक्त रेघोट्यांचा खेळ! </span></span>Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-1674229085590598462007-05-31T21:04:00.000-07:002007-06-01T20:24:15.266-07:00थोडा सा आसमान..<span class="">या, या मॅडम.. काय हवंय आपल्याला? म्हणजे कसला चष्मा हवाय? आम्ही बघा सगळ्या प्रकारचे चष्मे विकतो.. ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे!<br />चष्म्याबाहेरच जग कसं पाहिजे? हसरं, खेळकर की गंभीर? का खुसखुशीत विनोदी?<br /><br />प्रत्येक क्षण टिपायची धडपड करणारं की प्रत्येकाचे अनुभव इकडून तिकडून सारखेच म्हणून आपलं वेगळेपण सर्वांआधी छापायची धडपड करणारं?<br />आजकाल ब्लॉग लिहायला लागल्यापासून जो लिहायचा मोड ऑन केलाय, त्यातून बाहेरचं दाखवणारा की त्यातच गुंतवणारा असा चष्मा? काही दिसलं की लिही यावर..<br />फुगंव शब्दांचे फुगे, आणि कर त्यावर तार्किक विश्लेषण.. शब्दांच्या छटांची भाषांतरे.. आणि त्यामागच्या भावनांच्या गुंत्यांचीही?<br />प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं भाषांतर, वेगळे अर्थ.. आणि या कॅलिडोस्कोपमधून पहाताना जे लिहायचं होतं ते कुठतरी हरवूनच जातंय असं काहीसं?<br />नक्की काय?<br />त्या त्या क्षणी ते ते लिहावं वाटणं म्हणजे नक्की काय?<br />त्या क्षणांची उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया की छापखान्याची डेड्लाइन?<br />स्वसमाधानाची शेखी मिरवायला, सर्जनशीलतेचा डांगोरा पिटायला की प्रतिक्रियांच्या झूली मिरवूनही अलिप्त राहायच्या भासात मश्गूल रहायला?<br />मॅडम, तुम्हाला त्या वक्त्याची गोष्ट माहितीये का?<br />अतिशय उत्तम वक्ता, प्रभावी, पण त्याचा एकच प्रॉब्लेम होता.. कुठ्लाही श्रोता नसताना तो खूप छान बोलायचा. ज्याक्षणी कुणीतरी ऍकायला लागायचं त्याक्षणी त्याची बोलती बंद. तो स्वतःच स्वतःचा श्रोता कधी झालाच नाही असं करता करता.. तुम्ही वाचता का हो तुमचं लिहिलेलं एक वाचक म्हणून? का त्यासाठी वेगळा चष्मा देऊ? तटस्थ वाचकाचा?<br />काय म्हणता, आजकाल तुमच्या पोस्ट्मध्ये प्रश्नांचे गुंते वाढले आहेत?<br />अहो, असले तर असले..<br />आता असलेले प्रश्न टाकून जाणार कुठे? कदाचित फक्त लिहून सुटणार नाहीत, पण लिहिल्याचं समाधान तरी..<br />समाधान!!<br />आरून फिरून गाडी परत समाधानाच्या शोधात..<br />का समोरचा समाधानाचा स्टॉप डोळ्याआड करताय? तो दिसावा असा चष्मा देऊ?<br />दूरवर पाहिलं की शांत करत जाणार्या समुद्रासारखं शांतवणारं सुख आणि त्याच्या जोडीला समाधान असं एकदम दिसू शकणारा चष्मा पाहिजे म्हणताय.. हं..<br />आपले आभाळ मोजावे आपणच<br />घेऊ नयेत कुणाचीही तटस्थ निरीक्षणे<br />सांदीफटीतून जर विशिष्ट ओळख नसलेले काही<br />हाताला लागले तर ते आपले आभाळच असते!<br /><br />आपले आभाळ जोखावे आपणच<br />कुण्या दुसर्याने त्यात उड्डाणे भरण्याअगोदरच..<br />हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही<br />ते ही असू शकते आपले आभाळच..<br /><br />आपले आभाळ निरखावे आपणच..<br />कुण्या दुसर्याने त्यात सूर्यास्त चितारण्यापूर्वी<br />आपल्या आभाळात आपल्या नकळत<br />खूपदा होत असतात सूर्योदय, उल्कापात.. ग्रहणे<br /><br />आपले आभाळ कमवावे आपणच<br />घेऊ नये कुणाचा ढगही उसना<br />असे उसने उसने ढग, ग्रह, तारे हे सारे मिळूनसुध्दा<br />दरवेळेला आभाळ बनतेच असे नाही..<br /><br />आपले आभाळ समजून घ्यावे आपणच<br />मजेत बघावेत सटासट पडणारे तारे..<br />त्या आदिम सीनियर आभाळाखाली<br />आपले ज्युनियर आभाळ तोलत<br />पटापटा आपले बेसिक क्लियर करून घ्यावे<br />दोन्ही एकरूप होईपर्यंत!<br /><br />आपल्या आभाळाच्या शोधात<br />आपला जन्म..<br />कुणालाच नकळत विरून गेलेल्या ढगासारखा<br />निघून जाईल कदाचित..<br />पण निदान आपल्याच आभाळात जाईल!<br />संदीपच्या त्या आभाळासाठीचा चष्मा मीही शोधतोय... सापड्ला की नक्की कळवेन! </span>Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-1384665137164391142007-05-30T20:31:00.000-07:002007-06-07T16:12:37.504-07:00रूबरू रोशनी है..<span class=""><span class="">सेनापती बापट रोडवरून तुम्ही रिक्षातून जात असता, सिग्नल पडतो. अवघ्या दोन मिनिटांचा सिग्नल संपता संपत नाही लवकर, चिडचिड होते. आणि त्यात अचानक रिक्षाच्या एका बाजूने एखादा मळका हात 'ताई, काहीतरी द्या की वो..' असं म्हणून तोंड वेंगाडत उभा. त्या क्षणी काय प्रतिक्रिया असते? उदार मनाने त्याला भीक घालावी अशी की झटकून सरळ पुढं जावं अशी? भीक देऊन आपली जबाबदारी संपते असं वाटण्याची की न देता उगीच हुरहुरत रहाण्याची? हे सगळं आता अचानक लिहायचं कारण म्हणजे या रविवारी पुण्यात ( २७ मे) <a href="http://dreamindia2020.org/login.do">ड्रीमइंडिया- २०२० </a>या संस्थेने बाल-सुधार अभियानात <a href="http://picasaweb.google.com/grovershah/Campaign">Anti Child-Begging Campaign </a>ची कल्पना मांडली.<br /><br />गरीब झोपडपट्टीतील मुलांना शिकवावं अशा हेतूनं मुंबईत काही आयटी वाल्यांनी सुरू केलेली ही संस्था आज पुणे, हैद्राबाद, बेंगलोर, चेन्नई आणि दिल्ली या शहरात फोफावली आहे. पुण्यात जेव्हा हा ग्रुप चालू करायचं ठरलं तेव्हा फक्त ई-मेल या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला गेला,आणि त्यातून एकत्र आलेल्या मूठभर लोकांनी कसलाही अनुभव नसताना सुरू केलेले हे प्रयोग आता रजिस्टर्ड संस्था म्हणून नोंदले गेले आहेत. 'आपले घर' सारख्या अनाथाश्रमासाठी मदत करता करता 'मानव्य' सारख्या HIV ग्रस्त मुलांसाठी मदत सुरू झाली. इथवरच न थांबता हडपसरमधल्या झोपड्पट्टीत 'मस्ती की पाठशाला' सारखा उपक्रम राबवला जात आहे. 'आमच्या पोरांना कशापायी शिकवायचं? त्यापरीस त्यानला बूट्-पालीश कराया हावं..' ही पालकांची मानसिकता बदलवत 'असू दे, काम करून शिकतंय तर असूदे..' इथपर्यंतचा प्रवास लिहिताना एका ओळीत बसला तरी प्रत्यक्षात मात्र चिकाटीची कसोटी पाहणारा होता. त्यात आयटी पब्लिक म्हणजे कुणी आज इथे तर उद्या ऑनसाईट्ला, आज डेड्लाईन उद्या प्रोजेक्ट रिलिज अशा असंख्य अड्चणीतून व्हर्च्युअली ग्रुप ही संकल्पना राबवली गेली आहे.<br /><br />या झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवताना त्यांचा भीक मागण्याचा व्यवसाय आणि त्यामागचं दुष्ट्चक्र कळायला लागलं. मिळणारे पैसे खाण्यावर खर्च होण्यापेक्षा व्यसनात संपतात आणि न संपणार्या व्यसनांसाठी परत भीक्-चोर्या असं चक्र सुरू होत जातं. यानंतरच Anti Child-Begging Campaign ची कल्पना मांडली गेली. भीक मागणार्या मुलांना भीक देऊन कदाचित या चक्राला प्रोत्साहन देण्यापेक्षा खरंच त्यांना शिकायला आणि यातून बाहेर पडण्यासाठी मदत करता येऊ शकेल, असं वाटून रविवारी एम. जी. रोड्वर स्टॉल लावण्यात आला होता.<br /><br />आयटीवाले म्हणजे सदैव आपल्याच नादात, त्यांना फक्त त्यांचं लाईफ सोडून काहीही माहित नसतं अशा कायम होणार्या तक्रारीनंतर त्याच आयटीचा उपयोग करून अवघ्या ३ लोकांनी सुरू केलेल्या या संस्थेत आज फक्त पुण्यातच साठापेक्षा जास्त सदस्य आहेत. 'जगी घाण अन चिखलच सारा' असं म्हणत सार्या सिस्टीमला दोष देणं हे तर आपण करू शकतोच पण, आपल्या परीने यात काहीतरी सुधारणा करायचा पर्याय अजूनही संपला नाही आहे. संस्थेचं घोषवाक्य आहे-- 'Together we can , together we should!'<br />एक प्रयत्न आपणही करायला काय हरकत आहे?<br /><br />ता. क. 'मानव्य' बद्द्ल लिहिताना एड्सग्रस्त असा उल्लेख केला होता, चूक सुधारली आहे. </span></span>Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-41023514594640342062007-04-26T19:06:00.002-07:002007-05-17T21:18:18.926-07:00James, did you earn that?<span class=""><span class=""><span class="">रियान, शेवटी तुलापण स्वतःचं आयुष्य सार्थकी लागल्याचं सर्टिफिकेट कुणा दुसर्याकडून घ्यावं लागावं? युद्धातल्या त्या रणधुमाळीनंतर सगळं कळून- उमजून चुकलं तुला असं वाटलं रे!<br />ते धडाधडा आदळणारे बाँबगोळे,<br />रक्तामांसाचा सडा,<br />समुद्रकिनार्यावर प्रेतांचा खच<br />आजवर समुद्र म्हटलं की फक्त रोमँटिक भावना जुळलेल्या<br />रक्त - पाणी - रक्त<br />सगळं रोमँटिसिझम खरडून काढलंस तू..<br />गुळगुळीत कागदावरच्या रंगीबेरंगी बातम्या वाचायची सवय आम्हाला रे!<br />युद्ध कसं आकड्यांच्या भाषेत ऐकून सोडून देतो रे आम्ही..<br />'आजच्या गोळीबारात २ ठार १० जखमी'<br />एखादा सुस्कारा आणि चहाच्या घोटाबरोबर पुढली बातमी..<br />असं युध्द अंगावर येत रहात.. सगळं मन सुन्न करत..<br />तो सैनिक आईच्या आठवणीनं व्याकूळ झालेला?<br />आणि इमर्सन शिकवणारा तो मिलर.. युद्ध त्यालासुध्दा चकवा देऊन गेलं?<br />जखमींनी मरण परवडलं म्हणत कण्हायचं की 'जगलो वाचलो' म्हणून आनंदाचे उसासे टाकत रहायचं?<br />दोन वर्षं घरापासून दूर राहिलेला तू.. आपल्या भावांचे चेहरे आठवायच्या प्रयत्नात, पाटी परत परत कोरीच होत चाललिये का?<br />तत्वासाठीचं युद्ध की एकासाठी एक असं सूड घेत रहाणं?<br /><br />शांतीच्या मृगजळापाठी धावत रहाणं..<br />का कुठ्ल्यातरी कर्तव्यापोटी करत जाणं?<br />प्रश्नांची उत्तरं सापडली का कधी नंतरच्या प्रवासात..<br />तथाकथित सुखी आयुष्य का त्यावर युद्धाची छाया येत रहाते अधुनमधुन?<br />आणि तुझी आई.. अशीच कासावीस होत राहिली का रे, तुम्हा चौघांच्या आठवणीनं?<br />'तेरी राह तके अखियां, जाने कैसा कैसा होवे जिया' ...<br />का एका पोराला पाहुन डोळे निवले तिचे?<br />Saving Private Ryan पाहताना पडलेले असंख्य प्रश्न ..कधीही न पूर्ण होणारं कोलाज..<br /><br />'Earn this..' म्हणणारा मिलर आणि सभोवताली उध्वस्त इमारती..<br /><br />कित्येक स्वप्नं.. आशा.. सगळ्यांना ढिगार्यात सामावून घेत.<br /><br />आपल्या प्रश्नांचा चक्रव्यूह आणि आपणच अभिमन्यू..<br />.काही काही प्रश्न कधीच सुटत नाहीत, बगल देत जात रहायच?<br /><br /></span></span></span>Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-38874068857271261212007-04-09T20:57:00.000-07:002007-04-09T21:24:27.673-07:00प्रोग्रॅमर उवाच्!" फक्त आत्मिक समाधान महत्वाचं! "<br />" हं.. आता संसार असार आहे असं म्हण आता.."<br />" ग्रेटच आहेस तू, तुला काय माहित मी काय म्हणणार आहे ते पुढं.. बघ म्हणुन आपली वेव्हलेंग्थ जुळते!"<br />"बरं, हे संसार असार कुठुन आलं? कारण ३ आठवड्यापूर्वी तू QLC वर संशोधन करत होतास आणि त्यानंतर त्या इशिता शर्माच्या प्रोजेक्टमध्ये लागल्यावर तुला 'हे जीवन सुंदर आहे' असा साक्षात्कार झालेला. आता ती एंगेज्ड आहे हे तर कळुनपण एक आठवडा झाला, मग आज हा मूड का? सकाळी आजतक ऍवजी दुसरं कुठलं चॅनेल लावलंस काय्?"<br />"नाही, पण हे जीवन, संसार, प्रोगॅमिंग सगळी माया आहे!"<br />"हा, आता IT वर माया असेल नसेल तरी यामुळे उदंड माया मिळते एवढे ठाऊक आहे बाबा. आता ही तिसरी माया मेमसाब कोण? इस दिल मे बस के देखोवाली कुणी मिळाली काय्?"<br />"माया मेमसाब कुठुन आली इथे? ही मायाजालातली माया आहे!"<br />" अरे, हळू बोल. उगाच मोठ्याने 'माया' 'माया' करू नकोस.. साहेबाला विनाकारण संशय. आधीच माझ्यावर खार खाऊन आहे तो. ए, पण तुझी कसलीतरी मीटिंग होती ना? काय झालं?"<br />" अरे तेच अप्रेझल मीटिंग होती.."<br />"सहीच.. तुझं रेटिंग चांगलं होतं ना, मग धनलाभ काही?"<br />"तेच तर ना, शेवटी पैसा सर्वस्व नाही रे! आत्मिक समाधानालासुध्दा काही किंमत आहेच की.."<br />" हो ना.. आणि पुढे?"<br />" अरे, आपलं काम महत्वाचं, त्यामागची आपली तळमळ महत्वाची.. पैसा काय मिळत रहातो.."<br />" हा उपदेश हे अप्रेझल मीटिंगच फलित वाटतं!!"<br />"अर्थातच्!"<br />" हो ना, म्हणुन साहेबाने सात कंपन्या सोडुन इथे निगोशिएट केलं वाटतं.. "<br />" सात?"<br />" हो, आणि राहिलं तुझ्या आत्मिक समाधानाचं, तर उद्यापासून त्या खडुस घरमालकाला थोडं समाधान दरमहा पोचवत जा. आणि इस्क्वेअरच्या डोअरकीपरला पण थोडं देउयात.. कसं?"<br />"अरे पण्,..."<br />" हे बघ, प्रोजेक्ट डिलीवर केल्यानंतर येणारे सगळे 'बग्ज्' प्रोग्रॅमिंग ही माया आहे अशा दृष्टिने पहा आणि अप्रेझलला मायालाभाचा दृष्टीकोन ठेव. मग बघ, ती इशितापण कसा भाव देते ते. आत्मिक समाधान याहून वेगळं असं ते काय्?"<br />" इति अप्रेझल-अध्यायो समाप्तः!"Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-54574910038177765692007-03-26T20:45:00.000-07:002007-03-27T07:21:37.855-07:00क्रिकेट.. क्रिकेट?दि. २३ मार्च: तुलसी-पार्वती-प्रेरणा त्रिकूटाने परत एकदा सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, असे आम्हाला आमच्या खात्रीशीर सूत्रांकरवी समजते. १३ मार्चपासून या त्रयीने विश्वकरंडकामधून परतीसाठी दादरच्या सिध्दिविनायकाकडे साकडे घातल्याचे वृत्त आहे. आजच्या सामन्यानंतर परत एकदा दूरचित्रवाणीसंचाचा ताबा महिलावर्गाकडे जाण्याची शक्यता बळावली असून मंदिरा बेदी यानी याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.<br /><br />'पुण्यानंद' च्या खास पत्रकार समूहाने केलेल्या संशोधनानुसार अतिशय विस्मयकारक माहिती उजेडात आली आहे. प्रा. बुध्दिसागर यांच्या मते क्रिकेटची पाळेमुळे भारताच्या इतिहासात असून त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्यासंबंधी अधिक विचारणा केली असता त्यांनी आपल्या 'भारतीय इतिहास : महाभारतकालीन व रामायणातले संदर्भ' या प्रबंधाचा आधार दिला. वास्तविक पहाता रावणाच्या दहा तोंडामुळेच क्रिकेटमधील दहा खेळाडूंची संकल्पना अस्तित्वात आली असून शंभर कौरवांनी प्रथम विश्वकरंडकाला मूर्तरूप दिले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच भाषातज्ञानीही याला दुजोरा दिला आहे. भाषातज्ञांच्या मते सध्याच्या काळातला 'out' हा शब्द म्हणजे 'औट' घटकेच्या खेळीवरून आला आहे. इतिहासकारांनी याला स्वातंत्र्यपूर्व कालीन संदर्भ देत चंपानेर नामक खेड्यातला क्रिकेटचा प्रसार आणि भुवन नामक शेतकरी याचे योगदान यावर टिपणी केली. सध्याच्या काळातले क्रिकेट म्हणजे भारतीयांनी केलेले पाश्चात्त्यांचे अनुकरण यावर तज्ञांचे एकमत झाले.<br /><br /><br />यावर्षीच्या दहावीतल्या पाल्यांच्या पालकांनी केलेल्या मागणीला मान देत भारतीय संघाने आपले आव्हान प्रथम फेरीत समाप्त करण्याचा निर्णय घेतला, असे आमचा बातमीदार कळवतो. भारतीयानी क्रिकेटसाठी आपला अमूल्य वेळ घालवावा, हे अत्यंत व्यथित करणारे आहे असे भारतीय कप्तान राहुल द्रविड यांनी नमूद केले आणि भारताच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार म्हणून आपण हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले.<br /><br /><br />भारतीयांच्या कार्यशीलतेला अधिकाधिक वाढवण्यासाठीचा हा निर्णय अत्यंत स्पृहणीय आहे, असे राष्ट्राध्यक्षांनी सांगून भारतीय संघाला धन्यवाद दिले आहेत. या धन्यवादांचे श्रेय कुणाचे यावर फलंदाज आणि गोलंदाज यात मतभेद असे कळते. आमच्या दैनिकाने आज संध्याकाळी 'क्रिकेटः भारताचा उदयास्त' यावर एक परिचर्चा आयोजित केली असून श्रोत्यानी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. ( प्रवेश शुल्क : रू. १० श्रोत्यानी फुकट प्रवेशपत्रासाठी कृपया गळ घालू नये, ही विनंती.)Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-79746411493670474022007-03-22T19:59:00.000-07:002007-03-22T20:09:05.969-07:00भारत : २०२० साली एक चिंतनसध्या सर्वत्र 'भारताची २०२० साली होणारी संभाव्य भरभराट' आणि त्या संदर्भाने त्या वेळच्या पिढीची सुबत्ता यावर व्याख्यानमाला झडत आहेत. (नुकताच चितळेनी 'बाकरवडी: २०२० साली' असा एक परिसंवाद आयोजित केला होता. जिज्ञासूनी अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा. वेळः संध्या. ४ ते ४.३०. वि. सू. आमचा इतरत्र कुठेही ब्लॉग नाही.)<br />तर या पिढीच्या आरोग्याविषयी जागतिक परिषद पुण्यात भरली होती (स्थळः बापट वाडा,सोमवार पेठ) ज्याला उपस्थित रहायचे भाग्य मला लाभले. परिषदेचा एकंदर सूर असा होता की २०२० साली ह्र्दयविकार हा प्रमुख आजार असेल आणि नैसर्गिक जीवनशैली हाच यावर उपाय होऊ शकेल. या नैसर्गिक जीवनशैलीत चालणे या व्यायामप्रकारावर भर देण्यावर एकमत(!!) झाले. यासाठी सध्याच्या परिस्थितीत आपण जितके इंधनाचे स्रोत आहेत ते लवकरात लवकर संपवून भावी पिढ्याना चालणे आणि दुचाक्या यांचे प्रशिक्षण दयायला हवे.<br />विचार करा, २०२० साली एक शेजारीण दुसरीला म्हणते आहे," अगं, आमच्या सॅमने नवीन फेरारी दुचाकी घेतली बरं.." यावर ती नाक मुरडून म्हणते," दुचाकी!! कुठल्या जगात वावरते आहेस तू! आमचा मॅक तर ताशी १० किमीच्या गतीने चालत जातो!" मग लोक कोथरुडहुन तुळशीबागेत जायला गुगल मॅप्स् वापरतील. 'पुण्याच्या खड्ड्यातून भरधाव दुचाक्या कशा चालवाव्या' याचे प्रशिक्षण वर्ग निघतील(चालाल तर हसाल, न चालाल तर फसाल! अशा जाहिरातीसह). चालताना घ्यावयाची काळजी यावर वसंत व्याख्यानमाला रंगतील आणि 'दुचाकीवर अधिभार लावावा का' या विषयावर म. न. पा. मध्ये गदारोळ उडेल. Tour De India आयोजित केली जाईल आणि विजेत्याना पुणे- मुंबई प्रवासाइतके इंधन बक्षिस म्हणुन देण्यात येईल.<br />नुसत्या अशा कल्पनानी हुरळून जाऊ नका वाचकहो! या प्रगतीसाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. आज या क्षणापासून सर्वत्र गाडी वापरायचा असा निश्चय करा. कितीही जवळ असो, गाडीला अंतर न देता अंतर पार करा. ए, कोण तो प्रदूषण वगैरे बडबडतोय, तिकडे लक्ष नका देऊ, अहो, आता थोडाफार त्रास तर घ्यावा लागणारच ना रम्य भावीकालासाठी!!Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-432154443179296315.post-28012239091011829272007-03-18T16:40:00.000-07:002007-03-18T16:40:37.165-07:00नवी विटी, नवं राज्य!अस्मादिकांच्या 'ब्लॉग लिहिण्याचा' प्रस्ताव अखिल मित्रसंप्रदायात इतकी खळबळ माजवेल याची यत्किंचीतही कल्पना नव्हती मला! मी ब्लॉग लिहिणार हे कळताच प्रतिकियांचा पाऊस सुरु झाला.<br />१. "ब्लॉग.. हम्म्.. कशाशी खातात हे तरी माहित आहे का तुला?"<br />२. "वेळ घालवायला काहीतरी हवं की तुला.. पण नुसतेच कळफलकावर आपटाआपटी करू नकोस.."<br />३. "आणखिन एक ब्लॉग झेलायला तयार रहा रे!!.."<br />४. "फक्त आम्हालाच का तुला सहन करावं लागावं, कर सुरुवात.."<br />५. " तू लिहित रहा, फळाची म्हणजे कुणी वाचेल अशी अपेक्षा नको करू. 'लेखकु उदंड जाहला' अशा युगात 'वाचकु' लाभेल न लाभेल तरी आपण लेखनप्रपंच सुरु ठेवावा हेच बरं, नाही का?"<br />छिद्रान्वेषीनी माझ्या लेखनप्रतिभेला अडसर घातला तरी थांबून रहाणारी मी थोडीच आहे!! :-) आपल्या इतक्या अनुभवांचा साठा जगापुढे मांडला नाही तर जग एका मोठया प्रतिभावंताला मुकेल का काय, असे वाटून मी लगेच लेखणी हाती धरली. 'येथे पाहिजे जातीचे' हे त्या वंशाला गेल्याशिवाय कळणार कसे म्हणा!!<br />त्यामुळे 'एकला चलो रे' च्या धर्तीवर मनाच्या गुंत्यात गुंफलेला हा शेला विणायला तरी घेतला आहे. शेवटी केल्विनच्या शब्दात सांगायच तर, 'It's magical world, Hobbes, ol' buddy.. let's go exploring!'Sneha Kulkarnihttp://www.blogger.com/profile/08016966864570174581noreply@blogger.com6